मुख्य सामग्रीवर वगळा

जीवधन किल्ला ( Jivadhan Port )

जीवधन किल्ला ( Jivadhan Port )

     नाणेघाटा सातवाहन कालीन व्यापारी मार्ग जुन्नर ते कोकण यांना जोडणारा हा घाट या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधण्यात आले त्यापैकी एक नाणेघाटाचा पाठीराखा म्हणजेच जीवदानी किल्ला या या किल्ल्याची माहिती आपण मराठी स्टोरी हब याच्या मार्फत घेणार आहोत

किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास (  history of the port )

     हडसर किल्ला, ज्याला पेमगिरी किल्ला देखील म्हटले जाते. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी, १७ जून १६६३ रोजी, निजामशाही अस्ताला जात होती. त्यावेळी शहाजीराजांनी या संधीचा फायदा घेतला आणि निजामशाहीचा शेवटचा वंशज मूर्तिजा निजाम याला जीवधन गडावरील कैदेतून सोडवले. त्याला संगमनेर जवळील हडसर किल्ल्यावर (पेमगिरी) घेऊन गेले आणि त्याला निजामशहा म्हणून घोषित केले. यानंतर, शहाजीराजे स्वतः वजीर बनले आणि मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. किल्ल्याचा दरवाजा, गोरक्षगडाच्या दरवाज्याप्रमाणेच, कातळात कोरलेला आहे.

आपण किल्ल्यावर कसे जाऊ शकतो ? ( How can we go to the fort? )

     किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही पुणे येथून येणार असाल तर जुन्नर तालुक्यामधील घाटघर पासून आपण ट्रेक करू शकतो. घाटघर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. पुणे ते जुन्नर आणि जुन्नर ते घाटघर हा प्रवास तुम्ही एसटीने करू शकता. याच्या व्यतिरिक्त वैशाखरे या गावातून नाणेघाट ट्रॅक करून मग तुम्ही जीवधन किल्ल्याला जाऊ शकता. 

जीवधन किल्ल्यावर जाणारा मार्ग ( Route to Jeevdhan Fort )

     या गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. दोन्ही वाटासाठी घाटघर इथून मार्ग आहे. हा ट्रेक थोडा सोपा तर थोडा अवघड अशा पद्धतीचा आहे. या गडावर जाण्यासाठी आपल्याला दीड ते दोन तास लागतात या किल्ल्याची उंची जवळपास 3757 फुट इतकी आहे.

     पहिला मार्ग म्हणजे घाटघर येथून कल्याण दरवाजा मार्गे. हा मार्ग सुरुवातीला घनदाट जंगलातून जातो त्यानंतर मात्र तुमच्या करणाऱ्या पायऱ्यांचा मार्ग आहे या मार्गाच्या पायऱ्या तुटलेले आहेत पण रेलिंग असल्याने तेथून जाण्यास सुरक्षित वाटते. या पायरी आपल्याला थेट कल्याण दरवाजा पर्यंत घेऊन जातात. पण शेवटी दरवाजा जवळ चढून जाण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते 

     दुसरा मार्ग म्हणजे घाडघर पासून किल्ल्याला थोडा वळसा घालून जुन्नर दरवाजा मार्गे पण या दरवाजाची पूर्णपणे पडझड झालेले आहे त्यामुळे फार कमी पर्यटक या मार्गाचा वापर करतात. 

गडावर पाहण्यासारखी ठिकाणे ( Places to see in the fort )

     भक्कम आणि सुस्थितीत असलेला कल्याण दरवाजा, पडझड झालेला जुन्नर दरवाजा, तेथील गुहा, धान्य कोठार, पाण्याच्या टाक्या, बालेकिल्ला, येथील शिवाई देवीचे मंदिर, मनात धडके भरवणारा वानरलिंगी सुळका तसेच गडावरून नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड, कुकडेश्वराचे मंदिर, धसइचे छोटेसे धरण आणि माळशेज घाटातील काळे तुकतुकीत रस्ते यांचे मनोरंजक दृश्ये दिसतात. या व्यतिरिक्त अजूनही भरपूर पाहण्यासारखे ठिकाणे येथे आहेत. 

     जर तुम्ही पावसाळ्यात गेला तर तुम्हाला येथे वातावरण काही वेगळेच पाहायला मिळेल त्यात नाणेघाट जवळ रिव्हर्स धबधबा सध्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेले आहे त्यामुळे पावसाळ्यात या किल्ल्याच्या परिसरात पर्यटकांची भरपूर गर्दी असते ज्यामुळे स्थानिकांनाही त्याचा फायदा होतो. तीथे राहण्याची व खाण्याची सर्व सोयी स्थानिकाद्वारे येथे उपलब्ध केलेल्या आहेत.

     वानरलिंगी सुळका म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील पर्यटकांसाठी एक आव्हाहनच आहे. त्यामुळे अधून मधून रॉक क्लाइंबिंगचा, थरार येथे आपल्याला पाहायला मिळेल.

या ठिकाणावरील अन्य पर्यटन स्थळे ( Other tourist attractions in this place )

     या ठिकाणी आजूबाजूच्या भागात जर पाहिले तर बरेच किल्ले, ट्रेकिंग पॉईंट, पर्यटन स्थळे आहेत. जुन्नर भागात रेंज ट्रॅक करायचा विचार करत असाल तर चावंड किल्ला, नाणेघाट, जीवधन किल्ला निमगिरी व हनुमंतगड, हडसर किल्ला, शिवनेरी किल्ला असे बरेच पर्याय आपल्याकडे आहेत. जर आपल्याला वेळ असेल तर अन्य काही पर्यटन स्थळे जसे की साऊंड किल्ल्या जवळील कुकडेश्वर मंदिर माणिक डोह धरणाचा विस्तीर्ण जलाशय, जुन्नर भागातील लेणीसमूह इत्यादी ठिकाणांना देखील आपण भेट देऊ शकता. 

     तुम्ही जर या ठिकाणी ट्रेकला जायचा विचार करत असाल तर माझ्या माहिती प्रमाणे तुम्ही एकट्याने हा ट्रेक न करता एकतर ग्रुप सोबत हा ट्रेक करावा किंवा या ठिकाणावरील संपूर्ण माहिती असणारा सोबती घेऊन हा ट्रेक करावा ते तुमच्या सोयीचे ठरेल


धन्यवाद...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक स्वप्न असंही - भयकथा

नमस्कार मित्रांनो मी किरण मी तुम्हाला मला पडलेला भयानक स्वप्नाचं वर्णन थोडक्यात सांगत आहे. हे स्वप्न मला साधारणतः एक दीड महिन्यापूर्वी पडलं होतं पण अजूनही ते स्वप्न आठवलं तर अंगावरती काटा येतो. मित्रांनो मी शेतातलं दिवस भराचं काम संपवून घरी आलो. घरचं थोडं काम उरकून घेतले आईने केलेली गरमा - गरम भाजी - भाकरी खाल्ली आणि अंथरुनावर आडवा झालो. त्या दिवशी दिवसभर राबल्यामुळे झोप लगेचच लागली. शरीरात थकवा होता, आणि डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे झोप पण लगेच लागली. परंतु, झोपल्यावर काही मिनिटांतच एक विचित्र स्वप्न पाहायला सुरुवात झाली, आणि माझ्या शांत झोपेची वाट लागली. त्या स्वप्नात मी माझ्या गाडीवर प्रवास करत होतो. रस्ता ओसाड होता. आजूबाजूला घनदाट जंगल होते. मावळतीचे रंग आसमंतात पसरले होते. आणि थोडं पावसाचे वातावरण झाले होते. मी माझ्या विचारांच्या गर्दीत गाडी चालवत होतो. कुठेही मानव वस्तीचा मागमुस नव्हता. रस्ता ही ओळखीचा वाटत नव्हता. तरी मी पुढे चाललो होतो. आणि त्यातच एकाएकी मला समोर दिसले की कोणीतरी लिफ्ट साठी हात पुढे करत आहे. मी गाडी थांबवली. पण गाडीचा स्पीड जास्त असल्यामुळे गाडी थोड...

अनोळखी रस्ता- भयकथा

(ही कथा काल्पनिक असून या कथेचा कुठल्याही गोष्टींशी संबंध लावू नये ही नम्र विनंती. ) नमस्कार मित्रांनो ही घटना माझ्यासोबत गेल्या सीझनला म्हणजेच दीड वर्षांपूर्वी घडलेली आहे. त्यावेळी नुकताच उसाचा कारखाना चालू झाला होता. ट्रॅक्टर वर माझ्या गावातील एक होतकरू नवीन मुलगा ड्रायव्हर म्हणून ठेवला. मग मी माझी बाकीची कामं आणि ऊसतोड कामगारांवर लक्ष देऊ लागलो. सगळे ऊसतोड कामगार कामाला लागले. सगळं सुरळीत चालू झालं होतं. पण दहा - पंधरा दिवसातच ट्रॅक्टर वरील ड्रायव्हर काही कारणास्तव काम सोडून गावी निघून गेला. दुसरा ड्रायव्हर मिळत नसल्यामुळे मी स्वतःच माझ्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर बनलो.  ऊस तोडीच्या धंद्यात मी पण नवीनच उतरलो होतो. त्यामुळे मी आजूबाजुच्या बाकीच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर सोबत ओळख करून घेतली. कारण कारखान्यावरती येता जाताना त्यांच्या शिवाय दुसरं कोणीच माझ्यासाठी सोबतीचं नव्हतं. मी त्यांच्या सोबतच कारखान्यावर ट्रॅक्टर घेऊन जाऊ लागलो. पण महिन्याभरातच माझ्यासोबत अशी घटना घडली. ज्या घटनेची मी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. त्या घटनेने मला हादरवून सोडले. त्या दिवशी पहाटेच मी खेप खाली करून कारखान्...

हा खेळ सावल्यांचा- भयकथा

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एका गावातुन दुसऱ्या गावातून फिरणं म्हणजे आम्हाला काही नवीन नव्हतं. तर ते आमचं रोजचंच झालं होतं. असंच एक दिवस फिरत फिरत एका पांडववाडी गावामध्ये गेलो. गाव तसं छोटसं होतं. पण डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे आणि त्या गावातील एका जुन्या वाड्या मुळे त्या गावाची वेगळीच ठेवण दिसत होती. तो वाडा राज घराण्यातील पाच भावंडांचा होता. तो वाडा एका बाजूने पडलेला होता जरी तो पडलेला असला तरी तो वाडा आमचे लक्ष वेधून आकर्षित करत होता. त्या वाड्याबद्दल आम्ही एका मुलाला विचारले असता त्याने सांगितले की हा वाडा खूप पूर्वीचा आहे. जो अनेक दशकांपासून पडून होता. रात्री तेथे विचित्र आवाज ऐकू येत असल्याचे त्याने सांगितले.  तेवढ्यातच पुढे गेल्यावर हॉटेल जवळ झाडाखाली पाणी प्यायला म्हणून थांबलो. झाडाच्या पाऱ्यावरती एक आजोबा बसलेले होते. त्यांना त्या वाड्याबद्दल विचारले तर ते म्हणाले की हा वाडा एकेकाळी राजघराण्याचा होता, गावातील लोक म्हणायचे की त्या वाड्यात कुणालातरी मारण्यात आलं आणि त्याचं आत्मा तिथे भटकतो. वाड्यात येणारा प्रत्येकजण त्या शापाचा बळी ठरतो. त्यामुळे आता तो ओसाड आणि भीतीदाय...